Translate

Sunday, September 20, 2020

Crisis may occur Boycott Bollywood

बॉलिवूडचा बहिष्कार होण्याची भीती उद्भवू शकते

सुशांत सिंग च्या आत्महत्ये नंतर विशेषत: हिंदी चित्रपट सृष्टीचे सर्व सामान्य जनतेला न पटणारे रूप समोर आले, एक उभरता नायक त्याची अनेक जणींशी भानगडी, ड्रग्ज, किळसवाणा वाटणारा रोजच नवीन होणारा खुलासा, अहंकारच्या शिखरावरावरुन वाट्टेल ते आरोप, तोंडाला तोंड देवून चित्रपट सृष्टीची लक्तरे वेशीवर टांगणारी स्व घोषित महारणी (कादचित राजकीय पक्ष पुरस्कृत) नायिका...

 यामूळे सर्व सामान्य जनतेला सहज प्रश्न येवू शकतो "अरे आपण यांचे चित्रपट करमणूक म्हणून पाहतोय, यांना आपणच दिलेल्या पैशावर किती गुर्मी" 

कोरोना मूळे अनेक कलाकार बेरोजगार झालेत तो उद्योग पुन्हा कधी सक्षम रित्या चालू होईल याचा अंदाज नाही, चित्रपट गृह कधी चालू होणार माहिती नाही. 

या परिस्थितीत सर्व सामान्य जनतेला असे फुटक ज्वलंत चित्र पाहावयास मिळत आहे हे नक्कीच भविष्यासाठी चांगले नाही. 

"चित्रपट, नाटक पाहणे त्यात रममाण होवून जाणे महत्वाच नाही हे कोरोनाने सिद्ध केले आहे."

 आधीच चित्रपटाला कोरोनाने तसेच प्रेक्षकांनी या काळात नगण्य स्थान दिले आहे. चित्रपट गृह चालू करा यासाठी कोणीही बोलत नाही, टि व्ही मालिका चित्रण सुरु झाले असले तरी त्याकडे प्रेक्षक म्हणावा एवढा वळलेला नाही. (Already the film has been given a negligible place by Corona as well as the audience during this period. No one is talking about starting a movie house, even though the TV series has started filming, the audience is not so keen on it.)

येणा-या काळात हिंदी चित्रपट सृष्टीकडे सर्व सामान्य जनतेतील प्रेक्षक कायमची पाठ फिरवू शकतो हा संभाव्य मोठा आहे. कारण त्यातील किळसवाणे प्रकारच एवढे उघड होत आहेत.

यासाठी चित्रपट सृष्टीत सर्व काम करणा-यांनी वेळीच सावध होणे ही काळाची गरज आहे.

हिंदी  चित्रपट सृष्टी मधील उघडकीस येणा-या घमेंडी, ड्रग्ज, आत्महत्या, वारसा परंपरा, वशीला बाजी, पैसा,  अश्लीलता, भानगडी, गुन्हेगारी, जनतेच्या पैशावर चालणारी चैन, अहंकार आदी प्रकरांनी 
प्रेक्षकांनी चित्रपटांकडे कायमची पाठ फिरवली तर याचा विचार हवेत उडणा-या अनेकांनी करणे आवश्यक आहे. 

कारण ।।ये जो पब्लिक है सब जानती है।।

जी सर्व सामान्य जनता सत्तेचे तख्त बदलू शकते ती हिंदी चित्रपट सृष्टीला ही "BOYCOTT बहिष्कार" करु शकते!!!

Friday, September 18, 2020

Satara District Health System


 कोरोना काळातील सातारा जिल्हाची आरोग्य सुविधा


सुमारे अकरा मोठ्या तालुक्यांचा सातारा जिल्हा. अनेक ठिकाणी उसाचे बागायती क्षेत्र. साखर कारखानदारीतील अग्रसेर जिल्हा म्हणून साताराची ख्याती आहे. रयत शिक्षणाची पंढरी, नावाजलेले ग्राम पातळीवरील अनेक पुढारी गल्ली ते दिल्ली छाप पाडण्यात यशस्वी झाले आहेत. 

छत्रपती शिवाजी महाराज यांचे काळापासून सातारा आपली ओळख जपत आलेला आहे. निसर्गाची मुक्त उधळण झालीये या जिल्हामध्ये महाबळेश्वर, कास, बामणोली, तापोळा, कोयना असे अनेक ठिकाणांनी देशालाच नव्हे तर जगालाही भूरळ घातली आहे. 

एवढ सर्व काही असतानाही नाही ते फक्त आरोग्य सुविधा...

हो आरोग्य सुविधा आणि हे सिद्ध केलय कोरोनाने. ग्राम पातळीवरुन खासदार आमदार सरपंच निवडणूका लढविणारे नेते असो वा देशाला दिशा देणारे या सर्वांनी ग्राम आरोग्याचा विचार ही केलेला नाही.

लाखो लोक बाहेरुन येत होते कोरोना पसरु शकतो हे माहिती असतानाही मार्च २०२० पासून ग्राम पातळीवर कोविड रुग्णालये तयार करण्याची साधी कल्पना ही येवू नये.

सातारा जिल्हातील ग्राम स्तरावरील तालुका स्तरावर तसच जिल्हा स्तरावरील आरोग्य व्यवस्था किती तकलादू आहे हे कोरोनाने सिद्ध केले. 

यातून कोणी बोध घेईल हीही आशा नाही. कारण सातारकर कमालीेचे शांत आहेत. काही होवू द्या शांतीप्रियता ते सोडत नाहीत. 

लढवय्यापणा नसलेने त्यांचा लाभ नेते मंडळी नेहमीच घेत आले आहेत हे ही सत्यच...

असो कोरोनाने सर्वांनाच त्यांची पात्रता दाखवून दिली आहे 

Saturday, September 12, 2020

Covid Care Software | Pune Division

 Very important in the context of Covid 19 ..... !!

HOSPITAL WISE BED AVAILABILITY DASHBOARD



Where are the beds for the patients in Pune as well as in Pune division (Solapur, Kolhapur, Sangli, Satara, Pimpri Chinchwad) or not .... Are there any beds left in the hospital you want ... will you get them ... ??





 EMERGENCY CONTACT DETAILS: AMBULANCE- 108
PUNE ZP CONTROL ROOM 02026138082/02026138083.
PMC CONTROL ROOM- 020 25502110.
PCMC CONTROL ROOM- 02067331151, 02067331152.
KOLHAPUR CONTROL ROOM 0231-2659232.
SANGLI CONTROL ROOM-0233-2373032.
SOLAPUR CONTROL ROOM-18002335044, 02172310745.
SATARA CONTROL ROOM-02162 233025

Friday, September 11, 2020

Moti Lake Satara city

 राजधानी साताराच्या काळात राजवाड्याच्या शेजारीच असलेले तळे "मोती तळे" म्हणून ओळखले जात आहे.

या तळ्याचे पाणी एवढे स्वच्छ होते की मोती जरी यात पडला तरी तो दिसत होता असे म्हटले जात असे तसेच मोती नावाचा हत्ती या तळ्यात पाणी पिण्यास येत होता म्हणून मोती तळे नाव पडले असावे.



तसे पाहिल तर हे ऐतिहासिक तळे आहे. या तळ्याची रचना पुरातन दिसून येते, काही ठिकाणी भगदाड पडले आहे इतर ठिकाणी तळे भक्कम रित्या आजही उभे आहे.

नगर पालिका च्या मालिकचे हे तळे ऐतिहासिक दृष्ट्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. याकडे सातारा नगर पालिकेचे संपूर्ण दुर्लक्ष दिसून येते. तळ्या भोवती कूंपन घातले तरीही सातारकर यात कचरा टाकत असतात. यातील शेवाळे, वाढणा-या वनस्पती, गाळ वेळोवेळी काढण्यासाठी नगर पालिका उदासीन दिसते त्यामूळे नाव जरी मोती असल तरी अनोळखी व्यक्ति ला ही एक कचरा कुंडीच भासते.

विशेष म्हणजे परिसरात असणारे सातारकरांना आपल्या ऐतिहासिक वास्तू जपव्यात या बद्दल काहीही वाटत नाही त्यापैकी ही एक वास्तू आहे. 

तस पाहिल तर सातारा शहर हे ऐतिहासिक शहर मात्र निरुत्साही धोरणांमूळे मराठा राजधानी फक्त कागदावर राहिली असल्याचे चित्र आहे.

नगर पालिकेने, सातारकरांनी राजधानी साताराच्या खुणा जपण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.

Thursday, September 10, 2020

Satara fighting against corona

 


सातारा जिल्हा मध्ये कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. जिल्हा बंदी उठविण्याच्या आधीच लाखो लोक मुंबई पुणे तसेच बाहेरील भागातून जिल्हा मध्ये दाखल झाल्याचे प्रशासनास माहित होते. जिल्हा बंदी उठल्यानंतर किती लोक आले याची प्रत्यक्ष नोंद नाही. आता ई पास ची सक्ती शिथील झाल्यानंतर कोण कधी कुठून येतोय कुठे जातोय याचीही नोंद ठेवणे अशक्यच.

कोरोनाशी लढताना सातारा प्रशासन, नेते मंडळी यांची अनास्था पहिल्या पासूनच दिसून आली. कोरोना चाचणी केंद्र सुरु होण्यासाठी तब्बल १० ते १२ हजार रुग्ण संख्या होण्याची वाट पाहावी लागली. त्याच बरोबर जिल्हा प्रवेश प्रक्रिये मधील भष्ट्राचारही चर्चेचा विषय झालाच. जिल्हा शल्य चिकित्सक यांची बदली, सातारकरांचा सवय भान हरपल्याचा पुरावा, आशा ताईना न मिळालेला प्रतिसाद हे कोरोना युद्ध वाढत चाललेची खुण मानावी लागेल.

सुमारे ११ तालुके असलेल्या सातारा मध्ये कोविड रुग्णालयाची गरज उद्भवू शकते याची पुसटशी ही शंका प्रशासनास येवू नये हे विशेष आहे, जिथे लाखो लोक दाखल झाले तिथे रुग्ण वाढणारच त्यासाठी प्रशासनाने वेळीच पाऊले न उचलल्यामूळे रुग्णास बेड ही न मिळण्याची अवस्था सातारा सारख्या निम्न शहरी भागात झाली... 

तहान लागली की आड खणायचा या म्हणी येथे विचार येतो...

रुग्ण संख्या हाता बाहेर जावू लागली, बेडची कमतरता पडू लागल्यावर कोविड रुग्णालय उभे करण्याच्या हालचाली सुरु झाल्या.

हे रुग्णालय सुरु कधी होणार तो पर्यंत रुग्ण संख्या तितकी वाढणार...

सातारा मध्ये युद्ध पातळीवर गावोगावी कोविड रुग्णालये उभे करणे आवश्यक आहे हाच पर्याय होवू शकतो. आता तरी जागे होवून वेळीच पाऊले उचलणे गरजेचे नव्हे तर जगण्यासाठी अतिशय आवश्यक बनले आहे. 

साताराची शांतता त्यांच्याच मूळावर उठता कामा नये हीच अपेक्षा!!!

टिप: आपले मत जरूर नोंद करा, शेयर करा

Important information to contact the forts of Maharashtra in case of emergency

आपत्कालीन परिस्थितीत गडांवर संपर्क साधण्यासाठी महत्वपूर्ण माहिती पावसाळ्याच्या हंगामात अनेक ट्रेकिंग प्रेमी सह्याद्रीच्या गड-किल्ल्यांवर भटक...