Translate

Monday, May 10, 2021

Last Tweet of Kangana Ranaut

अभिनेत्री कंगना राणावत तिच्या बिनधास्त ट्वीटसमूळे गेल्या काही दिवसात चांगलीच चर्चेत आली होती. मग ते  मुंबई पोलीस यांचे बाबत असो किंवा समाजात घडणा-या अनेक ब-यावाईट घटनाबाबत असो.


अर्थात सोशल मिडीया हा प्लॅटफॉर्मच स्वताची मते जगासमोर मांडण्यासाठीच तयार करण्यात आलाय. कोणीही येथे कोणत्याही विषयावर आपली मते मांडू शकतो हा नियम सर्व सामान्य जनतेला लागू पडतो. पण जे सामाजिक स्तरावर काम करतात मग ते नेते असो किंवा कलाकार त्यांनी आपल्या सोशल मिडीयाच्या प्रत्येक पोस्टवर बारीक लक्ष ठेवणे गरजेचे असते.

कंगना राणावत ही तशी शुन्यातून विश्व निर्माण केलेली हरियाणाची अभिनेत्री. यशाची हवा डोक्यात गेली की डोक गरगर करायला लागत हा अनुभव सर्वानांच येतो. मग राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त असलेली कंगना याला अपवाद कसा राहू शकते नाही का.

धडाधड अगदी रोजच टीव टीव वाचून तीचे चाहते चर्चा करु लागले. वातावरण बदललं तसं तीच टीव टीव करणही बदलत गेल. तीच्या ट्वीटस् आवडीने वाचल्या जावू लागल्या त्यास views, like, comment, share मिळत गेल्या फॉलोअर्सची ही संख्या प्रचंड वाढत गेली तसतस ती बेताल होवून ज्या विषयाशी तिचा काडीमात्र संबंध नाही त्याबाबतही टीव टीव करत राहीली आणि इथचं ती चूकत गेली.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबतचे ट्वीट तिच्या ट्वीटमधील उतरती पायरी मानली जावू शकते. तिथून ती जास्तच ट्रोल होवू लागली. त्या आधी काही प्रमाणात मिळालेले यश तिला तेव्हापासून मानवले गेल नाही.


बरेच ट्वीटरकर तीचं अकौंटच सस्पेंड करा अशी मागणी करु लागले. अशा काळातही कंगना बेताल टीव टीव करतच गेली.

मीच राणी महाराणी आख्ख्या देशात माझ्यासारख कोणीच नाही हे सिद्ध केल ते तिला या वर्षी केंद्र सरकारने दिलेल्या Y सुरक्षा आणि गेल्या वर्षी एकाही चित्रपटात काहीही काम न करता पुन्हा राष्ट्रीय पारितोषिक अलगदपणे बहाल करणं.

यामूळे कंगना एखाद्या परी प्रमाणे हवेतच तरंगू लागली. याच दरम्यान पश्चिम बंगालच्या निडवणूका लागल्या आणि सत्ताधारी पक्ष निवडून आला. निकाल लागताच तेथे दंगल सुरु झाली. या परिस्थीत कंगना आपला ज्याच्याशी काडी मात्र संबंध नाही ज्या विषयातील आपल्याला काहीही समजत नाही त्या दंगली विषयी टीव टीव करुन गेली जे पंतप्रधान माननीय मोदी आणि पश्चिम बंगाल सरकार या दोघांनाही रुचल नाही आणि जे देशाच्या सामाजिक हितास बाधा आणणारे ठरले.

ते नेमके ट्वीट हे होते...


या ट्वीटमूळे ट्वीटरवर गहजब उडाला. जरी तीने तिची चूक लक्षात येताच ते डीलीट केल तरीही जो बूंद से गयी ... या उक्तीप्रमाणे घडल. अनेक जणांनी तिचा खरपूस समाचार घेतला.

ट्वीटर इंडीयाने या ट्वीटची गंभीर दखल घेत तीच अकौंट कायमस्वरुपी सस्पेंड केलं. जो तिला जबरदस्त धक्का आहे. तीने इंस्टाग्रामचं अकौंट ओपन केलय तेही बंद झाल्याची चर्चा आहे.

यावरुन एकच बोध घ्यावा उतू नये मातू नये यशाची हवा डोक्यात घालू नये...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करुन आवर्जून कळवा. आम्ही आपल्या करिता माहितीयुक्त, प्रेरणादायी, मनोरंजनात्मक लेख घेवून येत असतो. आवडल्यानंतर लाईक व शेअर जरुर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. 

तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला digitalshende@gmail.com या जीमेल वर सेंड करु शकता. आम्ही आपल्या नावासहीत इथे ते प्रसिद्ध करु.

धन्यवाद...

हेही वाचा

No comments:

Post a Comment

Important information to contact the forts of Maharashtra in case of emergency

आपत्कालीन परिस्थितीत गडांवर संपर्क साधण्यासाठी महत्वपूर्ण माहिती पावसाळ्याच्या हंगामात अनेक ट्रेकिंग प्रेमी सह्याद्रीच्या गड-किल्ल्यांवर भटक...