Translate

Friday, April 30, 2021

Diet in Corona - Doubts and the Solutions

ताकद वाढण्यासाठी अंडी ,मटण, चिकन,मासे खावे का?

कोरोना मधील आहार - शंका व समाधान



अंडी:-सध्या कोरोना मध्ये बहुतेक सर्वजण अंडी खात आहेत किंवा कधी सुरू करू असे विचारत आहेत.

अंडे हा पूर्ण गर्भ आहे.(High protein) साहजिकच पचायला जड , उष्ण - उष्णता वाढवणारा

बहुतांश ठिकाणी ब्रॉयलर कोंबडी ची अंडी मिळतात (क्वचित गावठी कोंबडीची) जी ब्रॉयलर कोंबडी व्यापारी उद्देशाने महिनाभरात स्टिरॉइड आणि तदसम आहार आणि इंजेक्शन देऊन वाढवली जाते.खरेदी करताना या कोंबड्यांचे सहज कुतूहल म्हणून निरीक्षण केले तर ती कोंबडी ज्या पद्धतीने वाढवली जाते त्यानुसार तिला स्वतःला स्वतःच्या पायावर उभे राहायची ताकद नसते किंवा पळायची ताकद नसते.

आयुर्वेदाच्या नियमानुसार आपण खाणार असणारा प्राणी हा चांगला असावा (शारिरीक दृष्ट्या तंदुरुस्त, शारीरिक व्यंग नसणारा ,आजारी-रोगी नसावा,चपळ तंदुरुस्त प्राण्यांचे मांस आणि अंडी जी ताकद देणार ती रोगट प्राण्यापासून मिळालेल्या मांस आणि अंड्यात नसते. & It really make sense.

याउलट देशी कोंबडी तयार व्हायला 5 ते 6 महिन्याचा कालावधी लागतो.ती चपळ काटक आणि निरोगी असते. वाढीसाठी कोणतेही अवास्तव खाद्य आणि इंजेक्शन वापरलेली नसतात.देशी गावठी प्राण्यांच्या मांस आणि अंडी खाण्यातून जी ताकद आणि प्रतिकारशक्ती वाढते ती साहजिकच सध्याच्या ब्रॉयलर मांस आणि अंड्यातून मिळणे दुरापास्त आहे.

चांगल्या प्रतीचे मांस आणि अंडी यातून हेच अभिप्रेत आहे.



मटण,मासे:- 

हीच बाब मटण ,मांस आणि मासे या इतर मांसाहार बद्दल लागू होते.ते नैसर्गिक स्रोतांमधून उपलब्ध झालेले असावेत किंवा नैसर्गिकरित्या वाढवलेले कृत्रिम खाद्य औषधी विरहित मिळावेत यासाठी आपण आग्रही राहायला हवे.

आणि त्या पद्धतीचे उपलब्ध होत नसेल तर ते ताकदीच्या उद्देशाने खाल्ले गेले तर उपयोग होण्यापेक्षा अपाय होण्याचीच शक्यता जास्त आहे.

ऋतू विचार 



सध्या उन्हाळा चालू आहे.आयुर्वेदा नुसार या ऋतूत अग्नी मंद असतो . शारीरिक ताकद कमी असते.भूक  मंदावते.बाहेर सूर्य त्याच्या उष्णतेने बाह्य सृष्टीचे जणू शोषण करतो.(याउलट हिवाळ्यात ताकद,भूक जास्त असते)

त्यामुळे उन्हाळ्यात उष्ण ,पचायला जड पदार्थ टाळावेत. मांस, अंडी ,मासे मुळात उष्ण आणि पचायला जड त्यामध्ये वापरले जाणारे तिखट,आले-लसूण,मिरे आदी खडे मसाले सध्याचे सॉस,व्हिनेगर अजून उष्णतेत भर घालतात.मुळात कमी असलेल्या भुकेवर ताण येतो.आणि आजारपणात मंदावलेली भूक ,कमी झालेली ताकद वाढायच्या ऐवजी या प्रकारच्या आहाराने अपचन खाल्लेले न पचल्याने पित्ताचा त्रास, जळजळ,जेवण न जाणे आणि पुन्हा अशक्तपणा या चक्रात आपण अडकतो. बरे होण्याच्या ऐवजी आजार वाढण्यास आपणच हातभार लावतो.

म्हणून उन्हाळ्यात वाळा,गुलाब,चंदन इ थंड गोष्टींची सरबत पचायला हलका आहार घ्यावा.तेलकट तुपकट तळलेले मांसाहार शक्यतो खाऊ नये असा प्रघात आहे.

शरीराला ताकद म्हणून मांसाहार घ्यायचा झाल्यास तो चांगल्या प्रतीचा तसेच मांसरस,आळणी सूप,नारळाचे दूध घालून पांढरा रस्सा अशा हलक्या स्वरूपाचा असावा. तिखट ,मसालेदार,फोडणी,ग्रेव्ही,सॉस या गोष्टी टाळाव्यात

याऐवजी ओले खोबरे ,कोथिंबीर,कोकम,धने पावडर,दुधी भोपळा (प्युरी करण्यासाठी),तूप ,नारळाचे दूध सोलकढी यांचा मांसाहार सोबत वापर केल्यास उष्णता न वाढता ताकद वाढण्यास मदत होते.

सोबतीला गुलकंद,मोरावळा,आवळा,पेठा, सब्जा,वाळा,कोहळा यांचे सेवन उष्णता कमी करायला मदत करते.


पर्याय- मुगाचे कढणं

लहान वाटी मुगामध्ये 2 अंड्या एव्हडी ताकद असते.प्रोटीन मिळते आणि कढणं स्वरूपात केल्याने मुगातील प्रोटीन आणि ताकद पाण्यात उतरते.liquid स्वरूपात घ्यायला सोपे,पचायला हलके,पित्त न वाढवणारे असे बलदायी कढणं पर्यायी म्हणून वापरणे योग्य.

तयार करण्याची पद्धत

लहान वाटी मूग, 7-8 ग्लास पाणी, उकळून मूग चांगले शिजल्यावर मुगातील पाणी गाळून घेणे

राहिलेले मूग घरात भाजीसाठी वापरणे 

गाळलेल्या मुगाच्या पाण्याला जिरे लसणाची फोडणी देऊन चवीपुरते मीठ साखर घालून प्यायला देणे.

याप्रमाणे मुगाचे कढणं,मुगाचे इतर पदार्थ मुगडोसा, मुगलाडू,, गव्हाची लापशी,शेवया खीर,शिंगाडा पीठ यांचा वापर शहाकारी वर्ग करू शकतो.

वैद्य राहुल दिलीप चव्हाण

शाश्वत आयुर्वेद क्लिनिक,सातारा
shashwatayurvedic.com
Cont- 9421619384

(वरील विषय हे वैद्यांचे वयक्तिक मत असून औषध वापर याविषयी सर्वजण सहमत असतील असे नाहीवापरा पूर्वी जवळील वैद्यांचा सल्ला घ्यावा ज्यांना आयुर्वेदाचे उपचार व विचार नको असतील त्यांनी कृपया मोठ्या मनाने दुर्लक्ष करावे)

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करुन आवर्जून कळवा. आम्ही आपल्या करिता माहितीयुक्त, प्रेरणादायी, मनोरंजनात्मक लेख घेवून येत असतो. आवडल्यानंतर लाईक व शेअर जरुर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो.
 


तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला digitalshende@gmail.com या जीमेल वर सेंड करु शकता. आम्ही आपल्या नावासहीत इथे ते प्रसिद्ध करु.

धन्यवाद...

हेही वाचा

Corona diet non-diet daily routine

 दिनचर्या पाळावी | वेळेत उठणे वेळेत झोपणे | वेळेवर पथ्यकर आहार घ्यावा


(सध्या लॉकडाउन मुळे जागरण करणे , मोबाईल इंटरनेट चा अतिरेक, त्यामुळे उशिरा रात्री 2-3 वाजेपर्यंत जागरण 
पर्यायाने सकाळी 10 -11वाजेपर्यंत  उठणे, विस्कळीत झालेल्या वेळा पत्रकामुळे झोप, नास्ता ,जेवण,अंघोळ,व्यायाम यांचे ताळतंत्र राहिले नाही जो 2-3 तासांचा वेळ व्यायाम ,प्राणायाम,योगासने,वाचन इ चांगल्या कामांसाठी  खर्ची पडायला हवा तो निष्कारण मोबाईल इंटरनेट वरती दिला जातो किंबहुना व्याधी अवस्था किंवा अनारोग्याचा पाया या चुकीच्या सवयींनी घातला जातो.)


केळी, पेरू,सीताफळ,ice क्रीम, कोल्ड ड्रिंक,फ्रीझ मधील पदार्थ,दही,गार पाणी ज्याने सर्दी खोकला होईल ते सर्व टाळावे...


उन्हाळा आहे उगाचच आले,लवंग,मिरी ,दही असे उष्ण पदार्थ टाळावे


दुधाचे आटवलेले पदार्थ पेढा,बासुंदी,श्रीखंड, आम्रखंड,पनीर,चीझ हे बेताने खावे टाळलेले चांगले

ताकद यावी म्हणून अंडी ,मासे,चिकन,मटण असे नॉनव्हेज पदार्थ पचायला जड असल्याने टाळावेत 

 घ्यायचे झाल्यास चांगल्या प्रतीचे आणि मांसरस,आळणी सूप,पांढरा रस्सा अशा स्वरूपात घ्यावे


त्याऐवजी मुगाचे कढणं, खजुराचे सरबत,ताजी भाकरी-चपाती फळभाज्या(दुधी,भेंडी,गवारी,कोबी,

फ्लॉवर,टोमॅटो, गाजर,बिट,मुळा,(उकडून,वाफवून कच्चे नको) तूप,हळद सुंठ टाकून दूध यांचा आहारात समावेश असावा


भाताचे प्रमाण कमी करावे तांदूळ 1 वर्ष जुना आणि कुकर ऐवजी पातेल्यात भात करावा तो पचायला हलका आणि कमी कफकारक

होतो

फळांमध्ये डाळिंब,खजूर,अंजीर,आंबा हे सिझन नुसार खावे


काळे मनुके,बेदाणे,सुके अंजीर,तवकिर,शिंगाडा,तूप,ताजे लोणी,सब्जा,वाळा, गुलाबपाणी

कोकम सरबत,आवळा सरबत,वाळा सरबत,खजूर सरबत,यांचा रेग्युलर पाण्यासोबत वापर करावा


भूक नसल्यास जेवण जात नसल्यास मुगाचे कढणं,सरबत,साळीच्या लाह्या,राजगिरा लाडू , असे पचायला हलके पदार्थ घ्यावेत


प्राणायाम, योगासने,हलका व्यायाम,चालणे,सायकलिंग, श्वसनाचे व्यायाम करावेत


ज्यांचे वजन जास्त आहे आणि कष्टाचे काम कमी त्यांनी दिवसा झोपणे टाळावे

दिवसा झोपायचे असल्यास टेबल खुर्चीवर बसून झोपावे (कफ आणि वजन वाढत नाही)

वैद्य राहुल दिलीप चव्हाण

शाश्वत आयुर्वेद क्लिनिक,सातारा
shashwatayurvedic.com
Cont- 9421619384

(वरील विषय हे वैद्यांचे वयक्तिक मत असून औषध वापर याविषयी सर्वजण सहमत असतील असे नाहीवापरा पूर्वी जवळील वैद्यांचा सल्ला घ्यावा ज्यांना आयुर्वेदाचे उपचार व विचार नको असतील त्यांनी कृपया मोठ्या मनाने दुर्लक्ष करावे)

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करुन आवर्जून कळवा. आम्ही आपल्या करिता माहितीयुक्त, प्रेरणादायी, मनोरंजनात्मक लेख घेवून येत असतो. आवडल्यानंतर लाईक व शेअर जरुर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो.
 


तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला digitalshende@gmail.com या जीमेल वर सेंड करु शकता. आम्ही आपल्या नावासहीत इथे ते प्रसिद्ध करु.

धन्यवाद...

हेही वाचा

Monday, April 26, 2021

How to use Vaishali Malam

आयुर्वेदिक वैशाली मलम अनेक त्वचा विकारांसाठी अत्यंत गुणकारी मलम आहे.

या मलम चा योग्य प्रकारे उपयोग केल्यास आपण त्वच विकारांपासून निश्चितच मुक्ती मिळवू शकता.

सदरचे मलम विविध त्वचा विकारांसाठी असे वापरावे.

पायांच्या भेगांसाठी

रोज रात्री झोपण्यापूर्व पाय गरम पाण्याने स्वच्छ धुवून कोरडे करावेत. त्यानंतर पायाच्या भेगांमध्ये आयुर्वेदिक वैशाली मलम भरावे. ते चोळू नये अथवा मुरवू नये. खडबडीच झालेल्या भागावर पातळ असा लेप लावावा. पायाला प्लास्टिकची कॅरी बॅग बांधावी. सकाळी पाय धुवावेत. पायाच्या भेगांची तसेच तळपायाची डेड स्किन  (मृत त्वचा) काढावी. या पद्धतीने पायाच्या भेगांची मृत त्वचा काढून रोज वैशाली मलम लावल्यास पायाच्या भेगा मूळापासून भरतात आणि पुन्हा येत नाहीत.

कोरडे इसब








हत्तीच्या त्वचेसारखी त्वचा काळी व जाड होते यालाच इसब असे म्हटले जाते. कोरड्या इसब मध्ये खूप मोठ्या प्रमाणात खाज असते. इसब विकारासाठी आयुर्वेदिक वैशाली मलम इसबच्या ठिकाणी २ ते ३ वेळा चोळून लावावे. याचा लेप म्हणून वापर करु नये. मलम इसबच्या ठिकाणी चोळून लावताना २ ते ३ थेंब पाणी घेवून पुन्हा वैशाली मलम चोळून मुरवावे. खाज आल्यास पुन्हा याच पद्धतीने मलम चोळून लावावे. मात्र मलम लावल्यानंतर खाजवू नये.

वांग

महिला - पुरुषांच्या चेह-यावर येणा-या वांग विकारावर आयुर्वेदिक वैशाली मलम अत्यंत गुणकारी आहे. रोज रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवून वांगाच्या ठिकाणी वैशाली मलम चोळून लावावे. सकाळी नेहमीप्रमाणे चेहरा धुवावा. वांग पुर्णपणे जाई पर्यंत आयुर्वेदिक वैशाली मलम रोज रात्री चोळून लावावे.


चिखल्या

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा पाण्यामध्ये सतत काम करण्यांमध्ये पायाच्या बोटांमधील त्वचा किरवंजल्या प्रमाणे होते आणि तेथे जखम होवून चिखल्या होतात. या चिखल्यांसाठी आयुर्वेदिक वैशाली मलम अतिशय गुणकारी आहे. रोज रात्री झोपताना तसेच दिवसातून १ ते २ वेळा बोटांच्या मधील जागा व पाय गरम पाण्याने स्वच्छ धुवून कोरडे करावेत. तसेच असलेल्या चिखल्यांच्या ठिकाणी वैशाली मलम चोळून लावावे.

याच बरोबर

जळवात, खरुज, गजकर्ण, नायटा, खवडे, स्तनाग्रांच्या चिरा या विकारांसाठी ही आयुर्वेदिक वैशाली मलम गुणकारी आहे.


वैशाली मलम हे संपूर्ण आयुर्वेदिक मलम असल्याने याचे कोणतेही साईड इफेक्टस् नाहीत.

सर्व मेडिकल्समध्ये हे मलम उपलब्ध आहे.

वैशाली मलमसाठी वितरक (डिस्ट्रीब्युटर्स ) नेमणे आहेत

हेही वाचा : वैशाली मलम आयुर्वदिक बहूगुणी मलम

अधिक माहितीसाठी संपर्क

डॉ. वैशाली माने, सातारा

अधिक माहितीसाठी संपर्क करा ... 9423826921    |  9405745800


आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करुन आवर्जून कळवा. आम्ही आपल्या करिता माहितीयुक्त, प्रेरणादायी, मनोरंजनात्मक लेख घेवून येत असतो. आवडल्यानंतर लाईक व शेअर जरुर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो.
 


तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला digitalshende@gmail.com या जीमेल वर सेंड करु शकता. आम्ही आपल्या नावासहीत इथे ते प्रसिद्ध करु.

धन्यवाद...

हेही वाचा

Effective Ayurvedic remedies for many skin ailments | Vaishali Malam


सर्वसाधारणपणे आपणा सर्वांनाच त्वचेचे काही काही तरी विकार, तक्रारी असतात.

वयोमानामूळे, कामामूळे, शरीरातील काही कमतरेमूळे तर कधी अनुवाशिंक रित्या अशा प्रकारचे त्वचा विकार आढळून येतात.

यामध्ये प्रामुख्याने 

पायांच्या भेगा

जळवात



पावसाळ्यात सतत पाण्यात काम केल्याने होणा-या चिखल्या



खवडे


गजकर्ण, 


महिला - पुरुषांच्या चेह-यावर येणारे वांग 



भाजलेल्याचे दिर्घकाळ राहणारे डाग


यामूळे अनेकांचे मानसिक खच्चिकरणही होताना दिसून येते.

त्वचेच्या या विकारांमधून लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी अनेक प्रकारचे इलाज, मलम यावर प्रचंड वेळ, पैसा होतो. मात्र रिझल्ट काही हवा तसा मिळताना दिसत नाही.

श्री विश्वयश आयुर्वेद फार्मसी, सातारा यांचे आयुर्वेदिक युक्त वैशाली मलम आपल्या त्वचेच्या वर उल्लेख केलेल्या अनेक तक्रारींवर अत्यंत गुणकारी असे आहे.

वैशाली मलम हे संपूर्ण आयुर्वेदिक मलम असल्याने याचे कोणतेही साईड इफेक्टस् नाहीत.

सर्व मेडिकल्समध्ये हे मलम उपलब्ध आहे.

वैशाली मलमसाठी वितरक (डिस्ट्रीब्युटर्स ) नेमणे आहेत

हेही वाचा : वैशाली मलमचा वापर असा करावा

अधिक माहितीसाठी संपर्क

डॉ. वैशाली माने, सातारा

अधिक माहितीसाठी संपर्क करा ... 9423826921    |  9405745800


आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करुन आवर्जून कळवा. आम्ही आपल्या करिता माहितीयुक्त, प्रेरणादायी, मनोरंजनात्मक लेख घेवून येत असतो. आवडल्यानंतर लाईक व शेअर जरुर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो.
 


तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला digitalshende@gmail.com या जीमेल वर सेंड करु शकता. आम्ही आपल्या नावासहीत इथे ते प्रसिद्ध करु.

धन्यवाद...

हेही वाचा

Sunday, April 25, 2021

Nanaji Deshmukh National Pride Gram Sabha Award 2021 | Manyachiwadi

 मान्याचीवाडीला नानाजी देशमुख २०२१ चा राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार


निसर्गाच्या कुशीत वसलेल्या पाटण तालुक्यातील जिल्हा सातारा मान्याची वाडी ने २०२१ चा महाराष्ट्रातून नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार पटकवला आहे.


कोरोनाच्या काळातही राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविण्यात मान्याचीवाडीने मान मिळवला आहे. 
या ग्रामपंचायतीस 10 लाख रुपये रक्कम पुरस्कार स्वरुपात प्रदान करण्यात आली आहे.

कोरोना पेक्षाही वेगळ जग आहे, कोरोना म्हणजे सर्वस्व नाही, कोरोना सोबत जगायला शिका
 
मान्याचीवाडीच्या कार्याला मानाचा मुजरा... 


आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करुन आवर्जून कळवा. आम्ही आपल्या करिता माहितीयुक्त, प्रेरणादायी, मनोरंजनात्मक लेख घेवून येत असतो. आवडल्यानंतर लाईक व शेअर जरुर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. 

तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला digitalshende@gmail.com या जीमेल वर सेंड करु शकता. आम्ही आपल्या नावासहीत इथे ते प्रसिद्ध करु.

धन्यवाद...

हेही वाचा


Satara Zilla Parishad Awarded National Deendayal Upadhyay Panchayat Empowerment

सातारा जिल्हा परिषदेला राष्ट्रीय दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार प्रदान



सातारा जिल्हा परिषद पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या उत्कृष्ट कामगिरीबाबत नेहमीच अग्रसेर असणारी जिल्हा परिषद आहे.

उत्कृष्ट कामगिरीबाबत अनेक पुरस्कार सातारा जिल्हा परिषदेने आजवर प्राप्त केले आहेत. या पुरस्कारात आता दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2021 (पडताळणी वर्ष 2019-20) मिळाल्याने पुरस्कारांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

२४ एप्रिल २०२१ रोजी पंचायतराज दिनानिमित्त दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमाने राष्ट्रीय दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा परिषदेस हा पुरस्कार प्राप्त झालेचे घोषित करण्यात आले. या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय पंचायतराज मंत्री नरेंद्रसिंग तोमर, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यांचे पंचायतराज मंत्री उपस्थित होते.

सातारा जिल्हा परिषदेला 50 लाख रुपये रोख ऑनलाइन माध्यमाने खात्यात जमा करण्यात आले. 

सातारा जिल्हा परिषदेचे हार्दिक अभिनंदन...!!!

हेही वाचा

१० सकारात्मक लघू कथा  मनातल्या घरात   देवपूजा एक उत्तम मेडिटेशन    कोरोनाफोबिया टाळा

           

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करुन आवर्जून कळवा. आम्ही आपल्या करिता माहितीयुक्त, प्रेरणादायी, मनोरंजनात्मक लेख घेवून येत असतो. आवडल्यानंतर लाईक व शेअर जरुर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. 

तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला digitalshende@gmail.com या जीमेल वर सेंड करु शकता. आम्ही आपल्या नावासहीत इथे ते प्रसिद्ध करु.

धन्यवाद...

Humble appeal to all News Channels | Media

 सर्वच न्युज चँनल , मिडीयाला कळकळीचे नम्र आवाहन 


चिंताजनक बातमी, काळजाचा ठोका चुकवणारी बातमी, धक्कादायक बातमी, काळीज हेलावून टाकणारी बातमी, गंभीर बातमी, हृदय पिळवटून टाकणारी बातमी

आणि अनेक प्रकारच्या हेडलाईन्स वापरुन प्रेक्षकांना खरतर सावध करण्याच्या हेतूने न्यूज चॅनेल त्यांचे काम करत असतात. 

सध्याच्या काळात मात्र हे न्यूज चॅनल आठवड्यातील २४ तास फक्त आणि फक्त कोरोना कोरोना आणि कोरोनाच्याच बातम्या एवढ्या दाखवत आहेत की त्या माप नाही. यांनी काय बातमी दाखवावी तो त्यांचा प्रश्न (कृपया राजकारणी लोकांसारख तुम्ही म्हणू नका आम्ही दाखवतो  मग तुम्ही का पाहता तुमचीच चूक आहे.) आपली प्रत्येक बातमीचा समाजातील अनेक प्रकारच्या जनतेवर दाट परिणाम होत असतो.

T.V. वाल्यांनो आम्हाला धडधडत्या चिता,पेशंटने भरलेले हाँस्पीटल्स्, स्मशानभुमीत अंत्यसंस्कारासाठी लाईन, आम्हाला दाखवू नका. त्यामुळे जनतेच्या मनात कोरोना बद्दल जास्त भीती निर्माण होत आहे.

महामारी आहे. सगळ्यांना माहीत आहे.परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे.हे पण सगळ्यांना माहीत आहे.

टि.व्ही. न्यूज चॅनलचा कहर तर नाशिकच्या ऑक्सिजन दुर्घटने पाहायला मिळाला इथ लोक तडफडत आहे, डॉक्टर त्यांना वाचवण्यासाठी जीवाचं रान करीत आहेत. मृत्यु झालेल्यांचे नातेवाईक आक्रोश करत आहेत आणि काही टी. व्ही. न्यूज चॅनल वाले या सर्व प्रकरणाचं लाईव्ह टेलेकास्ट करण्यात मग्न होते. अरे काय हीच माणुसकी. 

नातेवाईकांना धीर देण्याचा सोडून त्याच लाईव्ह टेलेकास्ट करण्यात कसलं तुमचं कौशल्य... 

या प्रकरणामूळे कितीतरी जणांनी हळहळ वाटून घेतली. ज्यांना हृदयाचा त्रास आहे. तब्बेत ठीक नाही तसच मानसिक रित्या कमकूवत आहेत त्यांना तुम्ही नाहक त्रास दिला. याच बरोबर घरात लहान मुले, तरुण विद्यार्थी , १० वी १२ वी ला असणारे विद्यार्थी, वृद्ध लोक, महिला यांनी आपल्या असल्या भयंकर बातम्यांमूळे त्यांच्या मानसिकतेवर प्रचंड ताण येतोच.

अशा कितीतरी घटना सांगता येतील...

टी. व्ही. न्यूज चॅनल नी जनतेला कोरोना काळात जास्तीत जास्त भितीयुक्त, घाबरगुंडी, गांगरुन टाकणा-या बातम्यांचा भडीमार खरच थांबवण गरजेच आहे...

T.V. वाल्यांनो कृपया खालील दिलेले मुद्दे जनतेला दाखवा !!

कोरोनाने बरे झालेल्या पेशंटचे इंटरव्ह्यु दाखवा.

आँक्सिजन सिलिंडर कुठे मिळतात ते दाखवा.

कुठल्या हाँस्पीटलमध्ये बेड उपलब्ध आहेत ते दाखवा.

रेमडिसिवीर इंजेक्शन कुठे मिळेल .हे दाखवा.

प्लाज्मा डोनर किती व कुठे आहेत त्याची माहिती दाखवा.

अँम्बुलन्स सेवा कुठे कुठे उपलब्ध आहे. ते दाखवा.

नवीन कोविड सेंटर कोणत्या शहरात? क़ोठे सुरु झाले. त्याची माहिती पत्त्यासह जनतेला द्या.

हाॅस्पीटलची जास्त आलेली बिले कशी कमी करावीत. याची माहिती दाखवा.

लसीकरणाबाबत जनजागृती करा.

रोज कोरोनामुक्त होणाऱ्या पेशंटचीच आकडेवारी दाखवा.

यामुळे खुप काही चांगले परिणाम दिसून येईल. 

आणि हे जमलेच नाहीतर टी.व्ही. चॅनल काही दिवस पूर्ण बंद करुन एखाद्या कोविड रुग्णालयात सेवा करायला गेलात तरी उत्तम. पण कोरोनामूळे आधीच काव-याबाव-या, गांगरुन गेलेल्या सर्वसामान्य जनतेचा करीत असलेला मानिसक छळ कृपा करु थांबवा.

 देव, देश, धर्माची भीती तुम्हाला वाटत नाही का?  दुसऱ्याला मरणाची भीती दाखवणे हे सुद्धा एक प्रकारचे पाप आहे. 

      आपल्या अनेक T.V. न्यूज चॅनलचा एक दर्शक


आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करुन आवर्जून कळवा. आम्ही आपल्या करिता माहितीयुक्त, प्रेरणादायी, मनोरंजनात्मक लेख घेवून येत असतो. आवडल्यानंतर लाईक व शेअर जरुर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. 

तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला digitalshende@gmail.com या जीमेल वर सेंड करु शकता. आम्ही आपल्या नावासहीत इथे ते प्रसिद्ध करु.

धन्यवाद...

हेही वाचा


    

Saturday, April 24, 2021

Satara Taluka Covid 19 Hospital and important contacts

 सातारा तालूका कोविड १९ हॉस्पीटल व महत्वाचे संपर्क

 या यादीमध्ये सातारा जिल्ह्यामधील कोविड संदर्भातील हॉस्पीटल्स महत्वाचे संपर्क  माहिती तालुका निहाय समाविष्ट करण्याचा मानस आहे. जेणेकरुन गरजवतांना याचा तातडीच्या कामासाठी उपयोग होऊ शकतो.

तातडीसाठी महत्वाचे संदर्भ समाविष्ट करावयाचे असल्यास व्हॉटसअप वर पाठवू शकता यासाठी
(व्हेरिफाय केल्यानंतरच ते सामील केले जातील)
 

कृपया नंबर्सची खात्री कॉल करुन घ्यावी. (मोबाईल नंबरवर सिंगल टॅप करुन येथूनच कॉल करु शकता)
आमचा आपल्यासाठी संग्रहीत माहिती सादर करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न ... 


सिव्हील हॉस्पीटल, सातारा


संपर्क 02162 230 051


जंब्मो कोविड रुग्णालय, सातारा

गुगल मॅप वर पहा 

संपर्क 02162 - 295 630  


सिंम्बॉयसेस हॉस्पीटल, सातारा

गुगल मॅप वर पहा 

संपर्क 02162 - 2285 577 | 02162 - 234 751  


मंगलमुर्ती हॉस्पीटल, सातारा

गुगल मॅप वर पहा 

संपर्क 02162 235 193 | 9172803040  


साई अमृत हॉस्पीटल, सातारा

गुगल मॅप वर पहा 

संपर्क 02162 234 238  


अजिंक्यतारा हॉस्पीटल, सातारा

गुगल मॅप वर पहा 

संपर्क 77 19 07 78 90  


यशवंत हॉस्पीटल, सातारा

गुगल मॅप वर पहा 

संपर्क 02162 232 432 | 02162 298 797 | 74 47 44 98 98 

website 


सातारा हॉस्पीटल, सातारा

गुगल मॅप वर पहा 

संपर्क 02162 228 288 


दिवेकर हॉस्पीटल, सातारा

गुगल मॅप वर पहा 

संपर्क 02162 253 118 | 77 22 04 31 18 


प्रतिभा हॉस्पीटल, सातारा

गुगल मॅप वर पहा 

संपर्क 02162 226 200 | 02162 226 201 


समर्थ हॉस्पीटल (एम.आय.डी.सी), सातारा

संपर्क 02162 240 011 | 86 98 49 00 29 


समर्थ हॉस्पीटल (राजवाडा), सातारा

गुगल मॅप वर पहा 

संपर्क 02162 282 068 


सिद्धीविनायक हॉस्पीटल, सातारा

गुगल मॅप वर पहा 

संपर्क 74 47 44 57 40 


विघ्नहर्ता हॉस्पीटल, सातारा

संपर्क 88 55 97 33 91 


काढ सिध्देश्वर कोविड हॉस्पीटल 

संपर्क 8459361196 


संजिवनी हॉस्पीटल, सातारा

गुगल मॅप वर पहा 

संपर्क 02162 233 533 


अंत्यसंस्काराच्या वाहनांची माहिती

१) फुटका तलाव ट्रस्ट MH 11 A 9929

Mo. 96 23 35 60 11 


२) शाहुपूरी MH 11 AB 8145

Mo. 77 56 91 22 28 


३) कोडोली (खरात) MH 11 T 9624

Mo. 96 23 53 25 82 


४) देगाव MH 11 G 107

Mo. 99 22 57 98 36 


५) करंजे MH 11 AL 1331

Mo. 80 07 77 79 18 

 

६) लेवे MH 11 F 5800

Mo. 98 81 86 36 62 


७) राजवाडा MH 11 AL 2448

Mo. 91 46 52 91 93 


८) गोडोली (कोवीड) MH 11 AL 798

Mo. 83 08 69 22 86 


रेमडीसीवर इंजेक्शन बाबात अन्न व औषध प्रशासन (मुथा चौक, सदरबझार, सातारा)

संपर्क               02162 235 220

श्री. गोडसे              955 292 6113

श्रीमती जवंजाळ     940 555 6424


बेड उपलब्धता व हॉस्पीटल माहिती 

टोल फ्री क्रमांक 1077


महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य

डॉ. बागल (सिव्हील हॉस्पीटल, सातारा)

संपर्क            985 041 5540                     827 509 5825


रुग्णांकडून जादा बील आकारणीबाबतचे तक्रार निवारण

श्री. संजय असवले (उपजिल्हाधिकारी)

855 280 0664

839 042 7186

श्री. प्रशांत म्हस्के

992 191 0799


आरोग्य विभाग, जि. प. 

02162 - 233 025


लसीकरणाबाबत डॉ. प्रमोद शिर्के  

940 444 0929


लॉकडाऊन बाबत माहितीसाठी

पोलीस नियंत्रण कक्ष

02162 233 833

02162 231 181




अधिक संदर्भ समाविष्ट करण्यासाठी संपर्क करा (https://wa.me/message/DD3W7CEQ6QZHJ1 )

Important information to contact the forts of Maharashtra in case of emergency

आपत्कालीन परिस्थितीत गडांवर संपर्क साधण्यासाठी महत्वपूर्ण माहिती पावसाळ्याच्या हंगामात अनेक ट्रेकिंग प्रेमी सह्याद्रीच्या गड-किल्ल्यांवर भटक...